Posts

Showing posts from May, 2009
http://www.youtube.com/watch?v=TQmz6Rbpnu0

जलसाक्षर गाव

जलसाक्षर गाव उन्हाळा आला आहे. ज्या गावांमध्ये पाऊस विशेष पडत नाही अशा गावांमध्ये तर या दिवसांत बरेचदा पाण्याचा प्रश्‍न निर्माण होतोच, पण ज्या गावांमध्ये भरपूर पाऊस पडतो, अशा ठिकाणीही बरेचदा पाणलोटाच्या कामाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. या परिस्थितीवर मात करण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक गावांनी पाणलोटाचा अभिनव उपक्रम राबवला, या गावांमध्ये परभणी जिल्ह्यातील गणेशवाडी या गावाचा अग्रक्रमाने उल्लेख करावा लागेल. गावाच्या जमिनीत पाणी अडविण्यासाठी बांध आणि पाणी जिरवण्यासाठी वृक्षारोपणासारखे चांगले उपक्रम या गावाने सरकारी मदतीची अपेक्षा न ठेवता राबवले. गणेशवाडी हे जेमतेम पन्नास उंबरठ्यांचे गाव. या गावात आधीच पाऊसमान कमी. पाणी नसल्यामुळे गावकऱ्यांचे खूप हाल होत असत. गावात पिण्याच्या पाण्याचाच मोठा प्रश्‍न होता, त्यामुळे लग्नकार्येही होत नव्हती. माणसांना, गुराढोरांना पाणी प्यायलाही नव्हते. जनावरे पाळणेही कठीण झाले होते. महिलांना पाण्यासाठी खूप पायपीट करावी लागायची. या गावातील लोकांनी शासनाकडे पाण्यासंदर्भात खूप तक्रारी केल्या. त्यानंतर चार किलोमीटर अंतरावरून पाणी आणणारी नळ योजना गा...

पाणी बचतीचे सिरसी मॉडेल

Image
पाणी बचतीचे सिरसी मॉडेल महाराष्ट्रातील अनेक गावांम ध्ये पाण्याची समस्या नेहमी उद्‌भवते. ज्या गावांमध्ये किंवा शहरांमध्ये ही समस्या नसते, त्यांना अशा गावांमधील लोकांचे दुःख उमगत नाही. अशा गावांमध्ये बरेच वेळा, "आमच्या गावचं काय सांगू? पानी लई लांबधरनं आणाया लागतंय बगा, सरकार काही ध्यानच देत नाही. गावात सतत दुष्काळ पडतोय; पण ऐकायलाच कुणी नाही. गुरं तडफडून मरत्यात. प्यायला पाणी मिळणंही मुश्‍कील, सरकार काही करत नाही, काय करायचं आम्ही?' असे संवाद हमखास ऐकायला मिळतात. पाणी म्हणजे जीवन, त्यामुळे पाणीच नसेल तर एखाद्या गावाची काय दशा होते, हे उन्हाळ्यात दिसतेच. याउलट काही ठिकाणी निसर्गतःच पाणी जास्त असते; पण त्या पाण्याचे व्यवस्थापन कसे करायचे हेच माहीत नसते. एखादा भाग दुष्काळी असतो; पण जेवढा पाऊस तिथे पडतो, त्याचे पाणी कसे साठवायचे याचे शास्त्रशुद्ध शिक्षण लोकांना नसते. बरेचदा पावसाचे पाणी वाहून जातानाच दिसते. पाण्याचे नियोजन, जलसाक्षरता याबाबत मोठ्या माणसांना जागरूक करायला पाहिजेच; पण लहान मुलांनाही जलसाक्षर केले तर त्यांना पाणी कसे वापरावे, याचे वळण लागेल. म्हणूनच असा एक अनोखा प्रयो...